हल्ली लोकांना काही करण्यात अपयश आलं किंवा काही करू शकले नाही तर एक सोपी पळवाट शोधतात आणि ती पळवाट म्हणजे नशीब.जे लोक आयुष्यात काहीच करू शकत नाहीत त्यांना जीवनात काही करायचेच नसते ती लोक नशीब नावाच्या पळवाटा शोधत असतात. मुळात त्यांना काही करायचेच नसते तर ते बिचारे लोक करतील तरी काय आणि त्यांना हि पळवाट सोपी वाटायला लागते. नशिबात नव्हता , नशीब कुठे आहे आपलं , नशिबात जे असत तेच होत , नशीब फुटकं यांचा आधार घेतात. आज काल हि अशी लोक खूप बघायला मिळतात. 
         नशीब हि गोष्ट अस्तित्वात नाही नशीब हे असलं काही नसतंच आपण अयशस्वी का झालो याची ती खास पळवाट असते हे नक्की. सगळं काही आपल्या हातात असतं. काही लोक नशीब नाही म्हणून प्रयत्न करणं सोडून देतात. नशिबात जे असेल ते होईल म्हणून सोडून देतात त्यांनी तस न करता सगळं काही आपल्याच हातात आहे हे लक्षात ठेऊन प्रयत्न करावे म्हणजे यश नक्कीच मिळेल. आपण सतत प्रयत्नशील राहावं ना कि या नशीबावर अवलंबून राहावं.

✍️शिवराज जाधव पाटील

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel