दुसऱ्याच दिवशी सुशर्म्याने दक्षिण दिशेने विराटावर स्वारी केली. या दिवसाच्या तिथीचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही. युद्ध वर्णनात म्हटले आहे कीं सूर्यास्तानंतर बऱ्याच वेळाने चंद्रोदय होऊन प्रकाश पडला. यावरून ही कृष्णपक्षाची सप्तमी-अष्टमी ठरते. पुढे दुर्योधनाचे तोंडी स्पष्ट उल्लेखच आहे कीं त्रिगर्तांनी सप्तमीला दुपारी हल्ला करण्याचे ठरले होते. विराटाचे बाजूने अर्जुन सोडून इतर चारहि पांडव युद्धात उतरले. मात्र युधिष्टिराने भीमाला सूचना दिली की ’इतर वीरांप्रमाणेच लढ, तुझ्या खास पद्धतीप्रमाणे झाड उपटून लढू नको नाहीतर ओळखला जाशील.’ ओळखणे टाळता आले तर तेरा चांद्रवर्षे पुरी करावीत असा युधिष्ठिराचा विचार असावा. पांडवांच्या मदतीने विराटाने त्रिगर्ताचा सपशेल पराभव केला व गायी सोडवून सर्वजण राजधानीला सकाळी परत आले. त्या आधीच, सकाळीच कौरवांचा उत्तरेकडून हल्ला आल्यामुळे, राजपुत्र उत्तर व बृहन्नडा वेषातील अर्जुन त्यांच्याशी लढायला निघून गेले होते. ती हकीगत पुढील भागात पाहू.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel