कळेल तैसे बोल तुजचि बोलेन । भीड मी न धरीन तुझी कांहीं ॥१॥

काय करुं देवा दाटलों जाचणी । न या चक्रपाणी सोडवण्या ॥२॥

कोठवरी धांवा पोकारुं केशवा । माझा तंव हेवा खुंटलासे ॥३॥

चोखा म्हणे आतां पुरे चाळवण । आमुचें कारण जाणों आम्हीं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel