एकदा दरबार चालू असताना बादशहाच्या मनात एक विचार आला .त्याने दरबालातील सर्व कामे बाजूला ठेऊन बिरबलाला विचारले ,बिरबल एखाध्या नालायक माणसासमोर गाठ पडली तर काय करावे ? बिरबल खूप कामात होता .कामाच्या वेळी बादशाहने असा विचित्र प्रश्न विचारलेले बादशाहाला आवडले नाही .परंतु काहीही न बोलता त्याला गप्प बसून आपले कामही करता येण्या सारखे नव्हते "महाराज आपल्या या प्रश्नाचे उत्तर आपलेला ह्याच वेळी मिळेल बिरबल दरबारातील आपल काम उरकून घरी गेला आपल्या एका मित्राला घरी बोलवलं तो म्हणाला उध्या तू माझ्या माझ्या बरोबर बादशहाच्या दरबारात ये बादशहा तुला प्रश्न विचारतील तू काही बोलू नकोस बादशाहने कितीही प्रयत्न केले तरी तू तोंड उघडू नकोस घरी आल्यावर मी तुला इनाम देईन दुसऱ्या दिवशी मित्राला घेऊन बिरबल बादशहा च्या दरबारात गेला बादशाहाला मुजरा करून तो म्हणाला खाविंद आपल्या कालच्या प्रश्नाच उत्तर माझा हा मित्र देईन. विचारा त्याला प्रश्न. बादशाहने त्याला प्रश्न विचारला एखादया नालायक माणसाशी गाठ पडली तर शहाण्या माणसाने काय करावे? बिरबालालाचा मित्र काही न बोलता चुळबुळ करत राहिला बादशाहने आपला प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला परंतु बिरबलाचा मित्र गप्पच शेवटी बादशहा चिडला तो बिरबलाला म्हणाला ख काय मूर्ख पणा चालवला आहे .तुझा मित्र तर काहीच बोलत नाही .बिरबल नम्र पणे म्हणाला खाविद माझ्या मित्रने आपल उत्तर दिले आहे .नालायक माणसाबरोबर गाठ पडली तर गप्प राहावे. बादशाहाला उत्तर मिळाले. परंतु बिरबलाने आपलेला नालायक ठरविल्या मुळे तो मनातून खजील झाला .

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel