सुरूवातीला मुस्लिम आक्रमणांची अनेक कारणं होती ज्यातलं मोठं कारण होतं मुस्लिम धर्माचा प्रचार. मुसलमान भारतात यायच्या आधी काबुल, पंजाब व सिंध मध्ये पसरलेले होते. भारताच्या धन-संपत्तीने मुसलमान राजांना आकर्षित केलं. याशिवाय भारतातल्या साम्राज्यांच्या आपापसातील युद्धांमुळे त्यांना भारतात पाऊल ठेवण आणखी सोप्पं झालं.

सुरूवातीचे मुस्लिम आक्रमण -

सर्वात पहिलं मुस्लिम आक्रमण इ.. ७१५ मध्ये मोहमद बिन कासिम याच्या नेतृत्त्वाखाली झालं. यानंतरचं आक्रमण होतम तुर्कीच्या सबुक्तागिनचं. .. ९८६ मध्ये तो भटिंडाचा राजा जैपालशी युद्ध करायला गेला. .. ९९१ मध्ये राजा जैपालने इतर हिंदू राज्यांशी हातमिळवणी केली तरीही हाती काही लागले नाही

घजनीचा महमूद-


 सबुक्तागिनचा सर्वात मोठा मुलगा घजनीच्या महमूद ने इ.. ९९७ ला सत्ता हातात घेतली. तो एक धार्मिक कट्टरपंथी होता ज्याचा मुख्य उद्देश हा इस्लाम धर्माचा प्रचार हाच होतामहमूद इ..१००११०२७ च्या दरम्यान भारतावर १७ हल्ले केले. त्याचा शेवटचा हल्ला इ.. १०२७ ला झाला होता. त्याचा मृत्यू इ.. १०३० मध्ये झाला

 मोहम्मद घोरी

पुढचा मुसलमार प्रशासक ज्याने भारतावर राज्य कला तो होता मोहम्मद घोरी ज्याने भारतावर ७ वेळा हल्ले केले. भीमदेव द्वितीय याने त्याचा विरोध केला आणि त्याला हरवलं. ११९१ मघ्ये मोहम्मद घोरी पृथ्वीराज चौहानशी युद्ध करायला पोहोचला. यात तो अत्यंत वाईट पद्धतीने जखमी झाला आणि त्याला मैदान सोडून जावं लागलं. पुढच्याच वर्षी पुन्हा दोन्ही सैन्यांमध्ये युद्ध झालं ज्यात यावेळी मोहम्मद घोरी जिंकला. .. १२०६ मध्ये मोहम्मद घोरीचा मजत्यू झाला

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel