मुहम्मद बिन तुघलकच्या राजवटीत झालेल्या विरोधामुळे बरीच स्वतंत्र राज्य उदयास आली. या साम्राज्याची स्थापना तुर्की अल उद दिन हसन बहमन बादशाह याने केली. यासाम्राज्याची स्थापना त्याने दिल्ली सत्तेच्या मुहम्मद बिन तुगलकच्या विरोधात केली. नजीर उद्दीन इस्माईल शाह ज्यामे दिल्ली सत्तेच्या विरूद्ध बंड केला होता त्याने जफर खान, ज्याने अलाउद्दीन बहमन शाह हा खिताब आणला, त्याचा राज्याभिषेकाचा प्रस्ताव ठेवला. १३४७ आणि १४२५ मध्ये बहमनची राजधानी अहसनाबाद होती, नंतर मुहम्दाबादला राजधानी घोषित करण्यात आलं. महमूद गवाँ राजवट ( १४६६ – १४८१) मध्ये उच्चतेच्या शिखरांवर पोहोचली. विजयनगर साम्राज्याच्या कृष्णदेवरायाने बहमनी राजवटीचा शेवटच्या राजाला पराजित केलं ज्यानंतर बहमनी साम्राज्य विघटीत झाले. १५१८ च्या नंतर हा साम्राज्य पाच राज्यात विभागलं गेलं, निजामशाही, कुतूबशाही, बरिदशाही, इमादशाही व आदिलशाही. या पाचही राजवटींनी एकत्र दख्खनची राडवट म्हणूनही संबोधलं जातं. मुहम्मद कुली कुतूब शाह च्या राजवटीत हिंदू व मुसलमानांचे संबंध अजून पक्के झाले आणि कैक हिंदू कुतूबशाहीत उच्चपदांवर नियुक्त झाले. यांपैकी प्रमुख मंत्री मजनना व अकाण्णा हे होते. गोलकोंडा व चार मिनार च्या उभारणीनंतर हैदराबाद या राजवटीची राजधानी बनली. या दोन्ही शहरांना कुतूबशाही राजांनी वसवलं होतं. या साम्राज्याने १७१ वर्ष गोलकोंडावर राज्य केलं आणि १६८७ मध्ये औरंगजेबाने त्यांची सत्ता जिंकून घेतली.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel