http://core0.staticworld.net/images/article/2013/03/pi-100029039-large.png

बौधायन भारताचे प्राचीन गणितज्ञ होते. पायथागोरसच्या सिद्धांतापूर्वीच बौधायननि भूमितीची सूत्र रचली होती परंतु आज जगात भूमितीशास्त्री पायथागोरस आणि युक्लिड यांचे सिद्धांतच शिकवले जातात. प्रत्यक्षात २८०० वर्ष (इ.स.पू.८००) बौधायनने रेखागणित आणि भूमितीच्या महत्वपूर्ण नियमांचा शोध लावला होता. त्या काळात भारतात भूमिती, रेखागणित आणि त्रिकोणमितीला शुल्व शास्त्र म्हटले जात असे.

शुल्व शास्त्राच्या आधारे विविध आकार-प्रकारचे नियम बनवले जात. दोन काटकोन समभूज चौकोनांच्या क्षेत्रफळांची बेरीज केल्यानंतर जी संख्या येईल तेवढ्या क्षेत्रफळाचा काटकोन समभुज चौकोन काढणे आणि त्या आकृतीचे त्याच्या समान क्षेत्रफळाच्या वर्तुळात परिवर्तन करणे, अशा प्रकारचे अनेक कठीण प्रश्न बौधायनने सोडवले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel