तरुण रामस्वामी अचानक वारला. त्याचे आई वडील, पत्नी व नऊ वर्षाचा मुलगा त्याच्या शवाजवळ  रडत बसले.
ते सर्वजण एका साधू पुरूषाचे भक्त होते. ज्याना ते महाराज म्हणत असत.

महाराजाना रामस्वामीची दुखःद बातमी कळताच ते रामस्वामीच्या कुटुंबियाना भेटायला आले.

घरात प्रवेश करताच रामस्वामीॅचे पूर्ण कुटूंब रडत असल्याचे पाहिले. महाराजाना पहाताच रामस्वामीची बायको अजून जोरात रडू लागली.
दुखाःने म्हणाली, महाराज, हे 
तरुण वयात आम्हाला सोडून गेल आता माझ्या मुलाच कसे होईल?
याना परत आणा. त्याना परत आणण्यासाठी मी काही क़रायला तयार आहे. 

महाराजानी पत्नी व वृध्द आई वडिलांचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला पण रामस्वामीच्या अकाली मृत्यूचा आघात पचविणे त्याना जड जात होते.

शेवटी महाराज म्हणाले, ठिक आहे, मला पंचपात्रभर पाणी द्या. ते शवाजवळ पंचपात्र घेवून बसले
ते म्हणाले, "ज्याला कोणाला रामा जिवंत व्हावा असं वाटते त्याने पंचपात्रातील पाणी प्यावे. रामा जिवंत होईल पण पाणी पिणारा मरण पावेल"

स्मशान शांतता.!

"चला, तुम्हीच म्हणाला होता ना की, रामा कुटुंबातील एकुलता एक कमविता आहे? त्याच्या ऐवजी कोण मरायला तयार आहे? ही एक आदलाबदलीची चांगली संधी आहे, हो ना?"

रामाची बायको व वृध्द आई एकामेकीच्याकडे पाहू लागल्या. वृध्द वडिल रामाच्या मुलाकडे पाहू लागले. पण कोणी पुढे येईना 
महाराज वडिलाना म्हणाले, बाबूजी, तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या मुलासाठी देत नाही का?
बाबूजी म्हणाले, "माझ्या पत्नीची
जबाबदारी माझ्यावर आहे. मी मेलो तर तिच्याकडे कोण पाहिल? मी नाही आयुष्य देवू शकत."

महाराजानी प्रश्नार्थक मुद्रेने वृध्द आईकडे पहात विचारले, अम्मा? 
अम्मा म्हणाली, "माझ्या मुलीचे पहिले बाळंतपण आहे. ती आता येणार आहे. मी मेले तर मुलगी व होणार्‍या बाळाला कोण पाहिल? तुम्ही रामाच्या बायकोला का विचारीत नाही?”

महाराजानी हसून रामाच्या तरुण पत्नीकडे पाहिले. ती अश्रूने भरलेले डोळे विस्फारुन म्हणाली, "महाराज, मला माझ्या मुलासाठी जगले पाहिजे. मी मेले तर त्याला कोण? कृपा करुन मला हा त्याग करायला सांगू नका..”

महाराजानी रामाच्या मुलाला विचारले, "बाळा! तू तुझे आयुष्य वडिलाना देण्यास तयार आहे?"

मुलगा काही बोलायच्या आत त्याच्या आईने मुलाला ओढून छातीजवळ धरून म्हणाली, महाराज, तुम्हाला वेड लागलय?
माझा पोरगा फक्त नऊ वर्षाचा आहे. त्याने अजून पुरेसं जग पण पाहिलं नाही. तुम्ही त्याचा कसा विचार करु शकता?"

महाराज म्हणाले, "बहुतेक याचा अर्थ तुम्हा सर्वांची या जगात काही ना काही कारणासाठी जरुरी आहे. रामाच एकटा बिन कामाचा होता म्हणून देवाने घेऊन जाण्यासाठी त्याची निवड केली. तरी आता त्याचे अंतिम संस्कार करायला सुरवात करायची का? आधीच ऊशीर झाला आहे”

एवढे बोलून महाराज निघून गेले. 

जोपर्यत जीवंत आहात प्रेम तोपर्यंतच.
त्यानंतर फक्त आनंदी क्षणाच्या आठवणी..!

"संकट समयी प्रामाणिक व श्रीमंतीत साधे रहा. अधिकार असताना समंजस व रागावलेला असताना शांत रहा. 
This is called the life management
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel