प्रिय मैत्रीण

तुझं पत्र मिळाल. वाचताना डोळ्यात अक्षरशः अश्रु उभे राहिले होते. नातं माणूस केवळ स्वार्थासाठी लावतो हे आज पुन्हा तुझ्यासोबत घडलेल्या प्रसंगातून अनुभवायला मिळालं. पण बघ ना मित्र आणि मैत्रीण हे दोन शब्द कधीच नाते नव्हते. म्हणून तर तू आज तुझी प्रत्येक वेदना मला सांगू शकतेस. आणि मला तुला जेवढं जमेल तेवढं चांगलं देण्याचा मी प्रयत्न करू शकतो. मित्र म्हणजे कदाचित "मी" ला संपवणार अन् सोबतिच्या "त्र" म्हणजे स्वार्थाला दूर घेऊन जाणार शस्त्र असाव. आणि मैत्रीण शब्दातला "ण" हा प्रत्येक दुःखावर फुंकर घालणारा, दिलासा देणारा गार वारा असावा. मी तुला आज हे सर्व लिहितो आहे. कारण मला तुझी सोबत आयुष्यभर टिकवायची आहे. केवळ दुःख व्यक्त करायला "तू" किंवा तुलाही दरवेळी मन मोकळं करायला "मी" एवढंच आपल्या मैत्रीत असाव असं नाही; आनंदाच्या प्रत्येक क्षणाचा तुझ्या मीदेखील कधी साक्षीदार व्हावं अन् जमलच तर तुझ्या दुःखाच माझ्या हातून निरसन व्हावं. तुला जमेल का? वाट पाहतोय तुझ्या उत्तराची.....

तुझा मित्र
किरण पवार

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel