संत बहलोल ज्या राज्यात राहत असत त्या राज्याचा बादशहा अत्यंत लोभी आणि जुलमी होता.

एकदा अतिवृष्टीमुळे दफन भूमीमाधिक माती वाहून गेली. तेथील कबरी उघड्या पडल्या. त्यामध्ये हाडे वगैरे दिसू लागली.

संत बहलोल तिथे बसले आणि त्यांनी काही हाडे समोर ठेवली आणि त्यामध्ये काहीतरी शोधू लागले. नेमकी त्याचवेळी बादशहाची स्वारी तिथे आली.

बादशहाने संत बहलोल यांना विचारले, "तुम्ही या मढ्याच्या हाडांमध्ये काय शोधत आहात?"

संत बहलोल म्हणाले, "हुजूर, माझे आणि तुमचे पूर्वज हे जग सोडून गेले. मी शोधत आहे की माझ्या वडिलांची कवटी कोणती आहे आणि आपल्या अब्बा हुजूर यांची कवटी कोणती?"

हे ऐकून बादशहा हसला आणि म्हणाला, "तुम्ही काय मूर्ख माणसांसारखे बोलत आहात? मूडद्यांच्या कवटींमध्ये काही फरक असतो का ज्यामुळे तुम्ही त्यांना ओळखाल."

संत बहलोल म्हणाले, "मग मोठी माणसे गर्व बाळगून चार दिवसांच्या खोट्या जगाच्या झगमगाटामध्ये गरीबांना कमी का लेखतात?"

संत बहलोल यांचे हे शब्द बादशहाच्या हृदयावर बाणाप्रमाणे आघात करून गेले.

संत बहलोल यांचे बादशहाने आभार मानले , त्या दिवसापासून बादशहाने अत्याचार करणे बंद केले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Rajeshri ghape

खूप छान ऊसतं आहे

Rajeshri ghape

आवडले

Rajeshri ghape

खूपच चांगली लेखमालिका आहे

प्रभाकर पटवर्धन

प्रतिक्रिया देणे अवघड आहे का?नक्कीच अवघड आहे.मी एकदा दिलेली प्रतिक्रिया अॅपने घेतली नाही.मला ठोकरून लावले.प्रतिक्रिया वाचली की लेखकाला बरे वाटते.कांही जण वाचतात सोडून देतात.सर्वच वाचक वाचून सोडून देत असतील असे वाटत नाही.कोण चुकत आहे?लेखक वाचक कि प्रतिक्रिया देणारा?मी गोंधळलेला आहे.मज पामराचा गोंधळ कुणी दूर करील काय?अॅपमध्ये तर काही त्रुटी नाही ना ?

प्रभाकर पटवर्धन

प्रतिक्रिया देणे अवघड आहे का?नक्कीच अवघड आहे.मी एकदा दिलेली प्रतिक्रिया अॅपने घेतली नाही.मला ठोकरून लावले.प्रतिक्रिया वाचली की लेखकाला बरे वाटते.कांही जण वाचतात सोडून देतात.सर्वच वाचक वाचून सोडून देत असतील असे वाटत नाही.कोण चुकत आहे?लेखक वाचक कि प्रतिक्रिया देणारा?मी गोंधळलेला आहे.मज पामराचा गोंधळ कुणी दूर करील काय?अॅपमध्ये तर काही त्रुटी नाही ना ?

प्रभाकर पटवर्धन

प्रतिक्रिया देणे अवघड आहे का?नक्कीच अवघड आहे.मी एकदा दिलेली प्रतिक्रिया अॅपने घेतली नाही.मला ठोकरून लावले.प्रतिक्रिया वाचली की लेखकाला बरे वाटते.कांही जण वाचतात सोडून देतात.सर्वच वाचक वाचून सोडून देत असतील असे वाटत नाही.कोण चुकत आहे?लेखक वाचक कि प्रतिक्रिया देणारा?मी गोंधळलेला आहे.मज पामराचा गोंधळ कुणी दूर करील काय?अॅपमध्ये तर काही त्रुटी नाही ना ?

Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to संतांच्या जीवनातील प्रेरक प्रसंग -भाग दुसरा


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
झोंबडी पूल
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
गांवाकडच्या गोष्टी
शिवाजी सावंत
कथा: निर्णय
खुनाची वेळ
मराठेशाही का बुडाली ?
पैलतीराच्या गोष्टी
अजरामर कथा
रत्नमहाल