शांतीदेवी मुलांच्या सर्वात सुंदर कथांपैकी एक आहे . महात्मा गांधी द्वारा प्रसिद्ध समितीने तिची पडताळणी केली जे शांतिदेवी बरोबर तिच्या पूर्वजन्मीच्या गावी गेले होते व तिथल्या 

घटनांचा आढावा घेतला . 
१८ जानेवारी १९०२ मध्ये मथुरेच्या रहिवासी चतुर्भुज च्या घरी एका मुलीचा जन्म झाला जिचे नाव ठेवलं लुगडी . जेव्हा लुगडी १० वर्षाची झाली तेव्हा तीच लग्न जवळच्याच दुकानदार 

असलेल्या केदारनाथ चौबेंशी करून दिलं होते . हि केदारनाथच दुसरं लग्न होतं कारण त्याची पहिली पत्नी मरण पावली होती . केदारनाथ ची मथुरेमध्ये आणि हरिद्वारला कपड्याची 

दुकाने होती . लुगडी फारच धार्मिक होती आणि खूप कमी वयात कित्येक धार्मिक स्थळांना जाऊन आली होती . अश्याच एका तीर्थयात्रेला गेलेली असताना तिच्या पायाला मार लागला 

ज्याचा इलाज प्रथम मथुरा व नंतर आग्ऱ्याला केला . 
जेव्हा लुगडी पहिल्यांदा गरोदर राहिली तेव्हा ओप्रेशन नंतर तिला मृत बालक झाले . दुसर्या खेपेच्या वेळी तिचा चिंतीत पती तिला आग्र्याच्या सरकारी दवाखान्यात घेऊन गेला जिथे 

तिने  ओप्रेशन नंतरच २५ सप्टेम्बर १९२५ ला एका मुलाला जन्म दिला . परंतु ९ दिवसांनंतर , ४ ऑक्टोबर लुग्डीची परिस्थिती बिगडली आणि तिचा मृत्यू झाला . 
लुग्डीच्या मृत्युनंतर एक वर्ष १० महिने ७ दिवसानंतर , ११ डिसेंबर १९२६ ला दिल्लीच्या चीरावाला मोहोल्ल्याच्या बाबू रंग्बाहाद्दूर च्या घरी एका मुलीचा जन्म झाला जिचे नाव त्यांनी 

शांतिदेवी ठेवले . ती सर्वसामान्य मुलीसारखीच होती पण ४ वर्षाची होईपर्यंत ती जास्त बोलू शकत नव्हती . पण जेव्हा तिने बोलायला सुरुवात केली तेव्हा ती वेगळीच मुलगी होती - 

ती आपल्या  पती आणि "बाळाच्या गोष्टी करत होती . तिने सांगितलं कि तिचे पती मथुरेत आहेत जिथे त्याचं कपड्याचे दुकान आणि त्यांचा एक मुलगा आहे . ती स्वतःला चौबईन 

म्हणवू लागली (चौबेची बायको) आईवडलांनी हि बालकल्प्ना  समजून दुर्लक्ष केलं . पण त्यांना चिंता वाटू लागली जेव्हा तिने पुन्हा पुन्हा आपल्या पातीबारोबरच्या मथुरेच्या 

जीवनाबाबत बोलायला सुरुवात केली . काही वेळा जेवणाच्यावेळी ती म्हणायची की "मथुरेमध्ये मी वेगळ्या प्रकारची मिठाई खात होती " . तिने आपल्या पतीच्या तीन निशाण्या 

सांगितल्या कि तो गोरा होता , त्याचा डाव्या खाकेत मोठा मस होता आणि तो चष्मा घालत होता . तिने हेही सांगितलं की तिच्या पतीचे दुकान द्वारकाधीश  मंदिराच्या समोर होतं . 
ह्या वेळेपर्येंत शांतिदेवी सहा वर्षाची झाली होती आणि तिचे आईवडील तिच्या गप्पांनी हैराण झाले होते . मुलीने आपल्या मृत्यूची सविस्तर माहिती सगळ्यांना दिली होती . त्यांनी 

त्यांच्या चिकित्सकाला हि गोष्ट सांगितली तेव्हा ते हैराण झाले कि एवढ्या छोट्या मुलीला ह्या गुंतागुंतीच्या शात्रीक्रीयेबद्दल कसे माहित ? 
अशा तर्हेने हे रहस्य अजून गहिर झालं . जस जसे काळ उलटला ती आपल्या आईवडलांना मथुरेला चलण्याविषयी विनंती करत राहिली . पण जवळ जवळ आठ ते नऊ वर्षापर्यंत तिने 

आपल्या पतीच नाव सांगितलं नाही कारण भारतात बायका आपल्या पतीचं नाव घेत नाही . जर कुणी विचारलं तर ती लाजून सांगत असे कि मला तिथे घेऊन जा मी त्यांना ओळखीन 

. एक दिवस दिल्लीच्या शाळेत शिक्षक असलेले नातेवाईक बाबू बिश्चंद शांतीला म्हणाले कि जर तिने पतीचे नाव सांगितले तर ते तिला मथुरेला गेऊन जातील . ह्या प्रलोभनाला बली 

पडून तिने त्यांच्या कानात पंडित कैदरनाथ चौबे हे नाव सांगितले . बिश्चंद यांनी सांगितले कि ते चौकशी करून मथुरेला जायची तयारी करतील . त्यांनी पंडित केदारनाथ चौबेंना पत्र 

लिहिलं आणि त्यांना दिल्लीला यायला सांगितलं . केदार नाथांना सर्व गोष्टींची खात्री करून सल्ला दिला कि त्यांचा दिल्लीत राहणारा नातेवाईक पंडित कान्जीमल संतीला अगोदर भेटेल 

. कान्जीमल सोबत एक बैठक बोलावली गेली ज्यात शांती देवींनी आपल्या पतीचा भाऊ म्हणून ओळख दिली . तिने आपल्या पतीच्या घराची आणि जिथे आपले पैसे गाडून ठेवले होते 

त्याची सिद्ध माहिती दिली . तिने हे सुद्धा सागितलं कि तिला मथुरेला घेऊन गेले तर ती स्वतः रेल्वे स्टेशन पासून घरी एकटी जाऊ शकते . कनजिम्ल च्या सांगण्यानुसार केदारनाथ १२ 

नोव्हेंबर १९३५ रोजी,  लुग्दीचा मुलगा नवनीत लाल आणि त्यांची आत्ताची पत्नी ह्याच्यासोबत दिल्लीला आले . शांतीने सहजपणे आपल्या पतीला ओळखलं आणि आपल्या आईला 

म्हणाली , "मी म्हटल होत ना ? माझे पती गोरे आहेत आणि त्यांच्या गालावर एक म्हस आहे ."  तिने आपल्या आईला पतीची आवडीची भाजी बनवायला सांगितली . नंतर 

केदार्नाथांनी जास्त पप्रश्न विचारल्यावर तिने आपल्या मथुरेच्या घरात असलेल्या विरीचा उल्लेख केला जिथे ती रोज आंघोळ करत असे . तिने आपल्या मुलाला देखील सहजपणे 

ओळखलं . खरं तर ती त्याला खूपच लहान असताना सोडून गेली होती . "वादा करून सुधा तुम्ही दुसर लग्न का केलंत ? " असा प्रश्न तिने आपल्या पतीला विचारला . 

केदारनाथ गेल्यानंतर शांतिदेवी खूप उदास झाली आणि मथुरेला जाण्याचा हट्ट करू लागली . गांधीजी द्वारे गठीत समिती तिला घेऊन मथुरेला पोचली . जिथे तिने आपल्या घरचा पत्ता 

रिक्षेवाल्याला सहज दिला . आपल्या घरी पोचल्यावर तिने तिथे असलेल्या लोकांना , सहज ओळखलं आणि घरातल्या मुख्य खोल्यांचा मार्गही सांगितला . शांतीने इतर जागाही सहज 

ओळखल्या आणि जिथे तिने पैसे लपवले होते ती जागाही दाखवली . आपल्या वडिलांकडे गेल्यावर तिने आपल्या आईवडिलांनाही ओळखलं आणि आईला मिठीमारून खूप रडली जे पाहून 

लोक हैराण झाले . 
आपल्या तपासा दरम्यान केदारनाथ चे एक मित्र पंडित रामनाथ चौबेन्नी एक महत्वपूर्ण गोष्ट सागितली , ज्याची आम्ही इतर सुत्रानाकाडूनही माहिती केली . 
जेव्हा केदारनाथ दिल्लीत होते तेव्हा पंडित रामनाथ चौबेंकडे एक रात्र राहिले होते . सगळे झोपले होते फक्त केदारनाथ , त्याची पत्नी , मुलगा नवनीत आणि शांती खोलीत होते . 

नवनीत गाढ निद्रेत होता . 
केदारनाथ नि शांतीला विचारले कि जर तिला गाठ होती आणि ती उठू शकत नव्हती तर ती गर्भवती कशी झाली ? शांतीने केदारनाथ सोबतची संभोगाच्या संपूर्ण क्रियेचे वर्णन केलं 

ज्यामुळे केदार्नाथांना पूर्ण विश्वास पटला कि शांती त्यांचीच पत्नी लुगडी आहे . जेव्हा हि घटनेबाबत शांतीदेविला विचारलं तेव्हा म्हणाली "हो ह्या गोष्टीमुळे त्याचा माझ्याबाबत पूर्ण 

विश्वास बसला होता ." 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to पुनर्जन्माचं सत्य


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
लोकभ्रमाच्या दंतकथा
मराठेशाही का बुडाली ?
शिवाजी सावंत
कथा: निर्णय
मृत्यूच्या घट्ट मिठीत
पैलतीराच्या गोष्टी