अर्पिली लेखणी दत्ताचे चरणीं । लिहुनी लिहुनी कैंक गेले ॥१॥

ग्रंथांचा डोंगर भ्रांतीचा सागर । चढुनी पडुनी कैंक मेले ॥२॥

लेखन पठन व्यर्थ माया शीण । जरी मन क्षीण नाहीं झालें ॥३॥

वटवृक्षातळीं सद्‌गुरु-माऊली । मौनसुद्रें भली हेंचि सांगे ॥४॥

जीव शिव एक विचार अशेष । त्रिगुणविवेक जग सर्व ॥५॥

बहुती लिहिलें तेंचि तें कथिंलें । अन्य न देखिलें सर्व जगीं ॥६॥

मायातीत हरि वर्णूं कैशापरी । सुमन वैखरी ’रंग’ आटे ॥७॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel