माझ नाव रुपाली - मी मुंबईत राहते -
आणि इथे जास्त
भुतांच्या गोष्टी ऐकायला सुधा मिळत नाहीत
किवा आपण हि कधीतरीच असे विषय
काढतो . शहरी भागात भूत आता फक्त
पुस्तक आणि आणि आजीने
सांगितलेल्या भुताच्या गोष्टीन मधेच
उरली आहेत . पण याहून हि एक वेगळे जग
आहे . भूत आहेत आणि माझा त्यांच्या वर
विश्वास आहे . कारण जी गोष्ट
मी तुम्हाला सांगणार आहे ती .
माझ्या साबोत घडली आहे जेव्हा मी ८
वीला शिकत होति.
दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या कि
मजा करण्यासाठी माझ्या आईच्या गावी म्ह
माझ्या आजोळी मालवण ला जायचो .
आज्जीचे घर तसे जुन्या काळातलेच होते.
खूप मोठे , समोर छोटीशी बाग ,
आणि बाजूला गुरांचा वाडा . आणि त्यात
भरपूर गाई आणि बैल होते. आम्ही मुंबईचे
म्हटल्यावर मुलांची मजा दिवस भर बागेत
खेळायचो , मामाने गाईचे दुध
काढायला शिकवले . आणि खूप
दंगा मस्ती सुधा करायचो .
त्यावर्षी हि आम्ही उन्हाळ्यात तिथे
गेलो होतो . पण
यावेळी आम्हाला घरच्या मोठ्या माणसांनी गु
जाऊ नको असा कडक आदेशच दिला होता .
तिथे लहान मुलांना जाण्यास
बंदी केली होती . म्हणून
मी आजीला त्या बद्दल विचारले तर तिने
सांगितले कि गेल्या ६ महिन्यापासून
जेव्हा जेव्हा गाईला बछडा होतो तो . २
दिवसात मरतो . आणि त्यामुळे गाई
सारख्या हंबरत असतात आणि माणूस तिथे
गेला कि त्याला शिंगणे मारायला येतात .
म्हणून तुम्ही तिथे जाऊ नका .
तेव्हाही वाड्यात २० गाई होत्या .
आणि त्या दिवशी अजून एक
बछडा जन्माला आला . आम्ही मुल
आनंदी झालो पण तो आनंद फार काळ
टिकला नाही . कारण सकाळी तो बछडा मृत
अवस्थेत वाड्यात पडला होता.
आता सहन शक्ती संपली होती मामाने
आजीला सांगितलं कि हे काही साध सुध
नाही आहे . नक्कीच काहीतारी भयानक
आणि अमानवीय घडतंय आपण
मांत्रिकाला बोलावून पूजा करून घेवूयात .
मांत्रिक आला आणि जसा त्याने
त्या गुरांच्या गोठ्यात प्रवेश
केला तसा त्याला विचित्र अनुभव आला .
तो लगेच बाहेर
पडला आणि म्हणाला उद्या बुधवार आहे
उद्या सकाळी सकाळी मी इथे
येती आणि काय करायचं ते बघतो .
दुसर्या दिवशी सकाळी ६
वाजता तो मांत्रिक आला . मी हि जागीच
होते कारण ती अमानवीय गोष्ट काय आहे
हे मला सुधा जाणून घ्यायचे होते .
तो आधी गुरांच्या गोठ्यात , मग बागेत
आणि नंतर विहरी जवळ
गेला त्याच्या हातात एक काठी होती .
विहरी जवळून तो पुन्हा गोठ्यात आला .
थोडा वेळ तो त्या गोठ्यात तसाच डोळे बंद
करून उभा राहिला . आणि नंतर
घरी आला आणि आजीला सांगितले . हे
प्रकार साधेसुधे नाहीत बछडे मारत आहेत
कारण तुमच्या गुरांच्या गोठया शेजारी जे
झाड आहे त्यावर एक भयानक पिशाच्च आहे
आणि त्यामुळेच हे प्रकार घडत आहेत .
तेव्हा माझ्या आजीने त्याला विचारले मग
गाई का मरत नाहीत फक्त बछडे
का मरतायत . त्वः तो म्हणाला प्रत्येक
पिशाच्च नवीन जीवनाला तरसलेल असत .
त्यामुळे नवीन जन्माला आलेल्या बछड्यानचे
तो प्राण घेतोय .
तो म्हणाला काळजी करू नका एक तांत्रिक
पूजा घातली कि सगळ ठीक होईल . त्यामुळे
ते पिशाच्च तिथून निघून जाईल . त्याने
सांगितलं कि पूजा आता चालू कृत
पूजा संपायला २ दिवस लागतील . त्याने
पूजेच्या सामानाची लिस्ट मामाकडे दिली .
थोड्याच वेळात मामा ते समान घेऊन परत
आला . मांत्रिकाने ९ वाजता पूजा सुरु
केली तो कसले तरी विचित्र मंत्र म्हणत
होता . ते सुधा जोरात जेव्हा त्याने मंत्र
बोलण्यास सुरवात
केली तेव्हा ज्या घटना झाल्या त्या कधी प
सुधा केला नव्हता .
अचानक आमच्या घरावर लहान लहान दगड
येवून पडू लागले आणि लगेच थांबले सुधा .
आम्हाला वाटल कि कोणी तरी मस्ती करत
असेल. पण ५ मिनिटांनी परत पुन्हा तेच
झाल लहान लहान दगडांचा घरावर वर्षाव
होऊ लागला . मामा धावत जाऊन घरावर
चढला पण तिथे कोणीच नव्हत . पण तरु
सुधा वरून काळ्या रंगाची वाळू आणि लहान
लहान खडे पडताच होते ते कुठून येत होते ते
कळतच नव्हत . हे तर काहीच नव्हत कारण
जसा मांत्रिक मंत्र पुटपुटत
होता तसा आता दगडांचा वर्षाव
थांबला सगळे घरात येवून पूजेला बसले .
पण अचानक घरावर थाप थाप असा आवाज
झाला आणि घाण वास सुधा येवू
लागला मामाने बाहेर जावून पहिले
आणि तो चक्रावला कारण आता घरावर
चक्क मानवी मल ( संडास ) येवून पडत
होता आणि खूप दुर्गंधी पसरत होती . हे
सगळ दुपारी १२ वाजेपर्यंत चालू राहील
पहिल्या दिवसाची पूजा मांत्रिकाने १२
वाजता थांबवली . मांत्रिकाने सांगितलं जे
काही घडतंय ते तो पिशाच्च करतोय पूजेत
विघ्न आणण्यासाठी. कोणीही बाहेर पडू
नका . मी उद्या येईन परत .
त्या रात्री आम्ही कोणीच झोपलो नाही पण
खडे आणि वाळू यांचा मधून मधून वर्षाव
होतच होता. पण
मानवी मलाचा सकाळी झालेला वर्षाव
रात्री नाही झाला . दुसरा दिवशी त्याने
पूजा सुरु केली आणि पुन्हा तेच होऊ
लागले . आम्ही मांत्रिकाला सांगितले
कि यावर काही उपाय करा .
तेव्हा तो बोलला हे थांबवू शकत नाही ते
चालूच राहणार . आणि सांगितले
कि त्याच्या खूप दुखतंय जस
कोणीतरी काठीने त्याला मारतय असा वाटत
होत . पण त्याने पूजा चालूच
ठेवली आता दगड मातीचा वर्षाव
थांबला होता . पण मांत्रिकाच्या डोळ्यातून
पाणी येत होत जस कोणी तरी त्याला खूपच
मारतय . ३ वाजता त्याने
पूजा आटोपली आणि ३ मंतरलेले खिळे घेतले
आणि उठून गोठ्याजवळ गेला आणि एक
गोठ्याला आणि दुसरा झाडाला ठोकला .
आणि उरलेला १ खिळा त्याने
घरच्या उंबरठ्याला ठोकला . आणि तिथेच
पडला लोकांनी त्याला उचलले
आणि पाणी दिले तो म्हणाला आता ते
पिशाच्च तुम्हाला त्रास देणार नाही . त्याने
घातलेली बनियन काढली आणि आम्ही पाहून
थक्क झालो कारण त्याच्या पाठीवर चक्क
काठीने खूप मारल्याचे वळ उठले होते .
त्याला मामाने उचलून त्याच्या घरी नेले
आणि जाताना पैसे देऊ केले पण त्याने ते
घेतले नाहीत . तो म्हणाला पैशांचा मोह
नसलेला बरा . त्या दिवशी पासून
त्या घटना बंद
झाल्या आणि काही दिवसातच गाई ने परत
बछड्या ला जन्म
दिला आणि आम्ही सुखावलो .
आणि त्याला काही झाल सुधा नाही
आवडली असेल तर नक्की प्रतिक्रिया द्य

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel