रामराज्य मागे कधी झाले नाही

होणार पुढेही नाही कधी

केवळ ते होते गोड मनोराज्य

कल्पनेचे काव्य वाल्मीकिचे

कधीच नव्हती रावणाची लंका

अपकीर्ति-डंका व्यर्थ त्याचा !

दोन्ही अधिराज्ये होती मानवांची

नव्हती देवांची -दानवांची

भाविकांनो, झाली होती दिशाभूल

सोडूनी द्या खूळ आता तरी !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel