क्षणाक्षणाला छळत भारता होती परवशता,
कठिण तो काळ असा होता ॥धृ०॥
सत्तावनला कुंड पेटले, धगधगत्या ज्याला,
चालुनि गेले सैन्य, घातला शत्रुवरी घाला ।
नेते होते तात्या टोपे, धुंडिराज नाना
झांशीची संग्रामदेवता संगर करताना- ।
अडला घोडा परदास्याला उल्लंघुनि जाता,
कठिण तो काळ असा होता ॥१॥
अत्याचारा वाव मिळाला अता इंग्रजांना,
माणुसकीचा अंश अल्पहे उरला ना त्यांना ।
तोफेवर बांधून मारती स्वदेशभक्तांना,
कितीक पडती बळी बंदुकी आग वर्षतांना ।
अंदमान दाटले, कितींच्या फास येत हाता,
कठिण तो काळ असा होता ॥२॥
उपशम झाला क्रांतीचा त्या, मात्र मनी होती-
स्वातंत्र्याची तीव्र भावना कोठे धगधगती ।
मधुनी कूका, वासुदेव, ती ज्वाला चेतविती,
इंग्रजांस आगीवर होती सदाचीच भीती ।
कुणास देती दंड, कुणाला पदव्यांचा भत्ता,
कठिण तो काळ असा होता ॥३॥
निराशेतुनी राष्ट्रसभेचा तदा जन्म झाला,
एकराष्ट्र-भावना मात्र ये तेव्हां उदयाला ।
महाराष्ट्र-केसरी क्षणी त्या क्षितिजावर आला,
आशा वाटे सह्याद्रीची भारतमातेला ।
स्वातंत्र्याचा दुष्कर त्याच्या करी वसा होता,
कठिण तो काळ असा होता ॥४॥
वातावरणे अशी राहिली धूमिल योगयुती,
जन्मुनि तेव्हां करित होता विनायक प्रगती ।
लिही तयाच्या कष्ट अपेष्टा भालावरि नियती,
अंगावरले घाव तयाचे जीवन भूषविती ।
वज्राचे आघात झेलण्या सिद्व सदा नेता,
कठिण तो काळ असा होता ॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to जय मृत्युंजय


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
मृत्यूच्या घट्ट मिठीत
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
शिवाजी सावंत