शेवटचा हा रामराम
सन्मित्रांनो घ्या प्रणाम ॥धृ०॥
भारतभूमिचे मणी विखूरले सेवेसाठी दीक्षित झाले ।
बंधुत्वाच्या मृदुल रेशमी धाग्याने एकत्र बांधले ।
नेमुनि देई त्यास विधाता कार्यासाठी भिन्न ठिकाणें ।
कधी कीर्तिच्या लाटांवर वा कधी उदधिच्या उदरी जाणे ।
जिथे योजना तेथे जाऊ
जळत्या अश्मावरती राहू ।
स्थान आपुले पहिले घेऊ ।
मला योजिले विधिने काम्, सन्मित्रांनो घ्या प्रणाम ॥१॥
रंगभूमि होई वसुंधरा, भवितव्याचे भव्य कथानक ।
इतिहासाच्या कालपटावर आपण पात्रे करतो नाटक ।
उत्तम आपुले साध्य गाठता ।
यशोगर्जना करील जनता ।
भरतवाक्य तें कानीं येता ।
भेटुनि बोलूं जयजयराम्, सन्मित्रांनो घ्या प्रणाम ॥२॥
अंदमानचा उदास ओढा सामावो माझ्या अस्थींना ।
स्फटिकतारकासारखी जान्हवी कवटाळो वा ह्रदयीं त्यांना ।
चैतन्याने उसळतील त्या बंधमुक्त भारत होतांना ।
सर्वकष गर्जना जयाची उच्चरवाने दुमदुमतांना ।
आक्रमिलेला सागर लंघुनि ।
समंध जाइल तेव्हा परतुनि ।
वैभव भारतभू सांभाळुनि ।
घरा सुखाचे होईल धाम्, सन्मित्रांनो घ्या प्रणाम् ॥३॥
त्याग आपल्या हातामध्ये, फल नियतीची इच्छा राही ।
मार्ग मुक्तिचा भारतभूच्या आत्मत्यागापरता नाही ।
त्या प्रगतीची ठेवा दृष्टी न्यून उरावे त्यांत न कांही ।
राखेमध्ये हौतात्म्याच्या वस्तु-वास्तुने पूत धरा ही ।
वास्तूचा त्या निश्चल पाया ।
भारतभूसाठी बांधाया ।
चला पुढे लोहित अर्पाया ।
ईशाचे ते पावन काम्, सन्मित्रांनो घ्या प्रणाम ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to जय मृत्युंजय


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
सापळा
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
मराठेशाही का बुडाली ?
कथा: निर्णय
मृत्यूच्या घट्ट मिठीत
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
शिवाजी सावंत