वेदपुरुष : त्या अश्रूंतील अनन्त भाषा त्या ओट्यावर बसलेल्या पांढरपेशांस काय समजणार ? त्या मोत्यासारख्या अश्रूंना, मोत्यांची भिकबाळी कानांत घातलेल्या जमीनदाराकडे बघत ते हंसत आहेत. अश्रूंची जगांत टर व्हावी ना ?

वसंता : हे अश्रूं फुकट का जातील ?

वेदपुरुष : पाण्यांतून वीज निर्माण होते. डोळ्यांतील पाण्यांतून फारच झपाट्यानें महान् विद्युच्छक्ति निर्माण होत असते.

वसंता : ती शक्ति जगाचा संहार करील.

वेदपुरुष : जग खर्‍या धर्माचें उपासक जर न होईल, तर जगाचें या विद्युच्छक्तीनें भस्म होईल.

वसंता : कांहीं बोलाचाली सुरू झाली. ऐकूं या.

धोंडभट : काय विठये! कशाला आलीस ?

केशव पाटील : आली भीक मागायला.

हरिपंत : नवर्‍याबरोबर तुरूंगांत जावें कीं नाहीं ?

विठी : या तान्ह्या पोराला घेऊन कोठें जायचें दांदानो ?

धोंडभट : म्हणजे तुझ्याहि मनांत जायचें होतें ना ?

विठी : ते गेले मग आपण का मागे रहायचें ?

जमिनदार : रामसीतेचाच जणूं तुमचा जोडा !

हरिपंत : तुरुंगात खायला मिळालें असतें, पोटभर पाणी मिळालें असतें, पोराला दूध मिळालें असतें, विठ्ये! वेडी तूं, उगीच राहिलीस.

केशव पाटील : जा, नीघ येथून तुम्ही माजलीं आहांत सारीं. आमच्या हातांत तुमच्या नाड्या आहेत. लागलीं नाचायला वानरें! किती दिवस अन्नापाण्यावाचुंन राहतां तें तर दिसूं दे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel