सातवें दर्शन

वेदपुरुष : आजचा आपला शेवटचा दिवस !

वसंता : आणि मग मला सोडून तूं जाणार ?

वेदपुरुष : तुला दृष्टि आली असेल! अजूनहि आली नसेल तर ती केव्हां येणार ?

वसंता : तूं माझी खरी मुंज लाविलीस! मला द्विज केलंस. माझा पुनर्जन्म झाला! नवीन डोळे, नवीन कान, नवीन हदय, नवीन मन, नवीन बुध्दि, नवीन आत्मा! सारें नवीन झालें.

वेदपुरुष : जें आतां दिसेल त्याच्याशीं सत्य रहा. डोळ्यांवर पडदे बांधूं नकोस. चल आतां जाऊं.

वसंता : आज आकाश फारच खिन्न दिसत आहे. सृष्टि सुन्न वाटत आहे.

वेदपुरुष : तो घोळका तेथें कां जमला आहे ?

वसंता : कोणी तरी मेलें असेल! हिंदुस्थानांत कोणी तरी मेलें म्हणजे सारे जमतात! जिवंत असतांना महाग असतात !

वेदपुरुष
: जिवंत असतांना कांहीं द्यावें लागतें; मेल्यावर जाळायचें असतें! खांदे दिले कीं भागतें. लांकडे रचलीं कीं झाले.

वसंता : आंत प्रेत आहे. कां बरें खोळंबा ?

वेदपुरुष : जरा कान देऊं म्हणजे उलगडा पडेल.

एकजण : तरी याच्या भावाला सांगितलें होतें कीं तूं जाऊं नकोस. परंतु ऐकतो कोण ?

दुसरा : बोर्डांत निवडून यायचें आहे त्याला. जिवंत राहणा-यांनीं मरणार्‍याच्या भोंवतीं किती दिवस रहावयाचें ? भावाच्या निवडणुकीच्या वेळेसच यालाहि आजारी पडण्याला व मरण्याला फावलें. आज निवडणुकीची तारीख आणि ह्याच्या भावाची मरण्याची तारीख.

पहिला : कालपासून तीन निरोप पाठवले. येता तर ? मरणाराला बरें वाटलें असतें.

तिसरा : येतों येतों असें उत्तर आलें, परंतु अजून आले नाहींत. प्रेत किती वेळ ठेवायचें तरी ?

दुसरा : परंतु आतां एक मनुष्य आला, त्याच्याबरोबर काय आला निरोप ?

पहिला : आतां एवींतेवीं भाऊ मेलाच आहे तर काम आटोपूनच येतों. चारच्या सुमारास येतों !

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel