“I was hoping that you would, even if you did not stand for a fresh election at any rate complete your present term which does not expire till the middle of १९०२; that during that time I might show some useful work in the local Council so that when you retired, you might consider me as not quite the least deserving among  those who are working for public good in this presidency, at a good respectful distance behind you.”- याचा सारांश असा आहे की, 'आपण आपली इच्छा नसली तरी निवडणूक संपेपर्यंत राजीनामा देऊ नये. तोपर्यंत मला प्रांतिक कौन्सिलात काही तरी उपयुक्त कामकाज करून लायकी दाखविता येईल. म्हणजे मग आपणांस मी अगदी कच्चा शिष्य आहे असे वाटणार नाही.' गोखल्यांनी गेल्या वर्षी प्रांतिक सरकारच्या अंदाजपत्रकावर टीका करिताना दुष्काळातही दयाळू सरकार कसे दुष्ट असते हे सांगितले. यंदाही थोडयाच दिवसांनी त्यांनी वर सांगितलेल्या जिल्हा म्युनिसिपालिटी बिल आणि लँड ेरव्हिन्यू कोडच्या दुरुस्तीचे बिल या दोन्ही प्रसंगी चांगलीच कामगिरी बजावली होती. फेरोजशहांस त्यांची लायकी शितावरून भाताची परीक्षा या नात्याने करिता आलीच. या जागेसाठी इब्राहिम रहिमतुल्ला आणि बम्मनजी पेटिट हे वतनदार गृहस्थ उभे राहणार होते; परंतु फेरोजशहांनी त्यांची मने वळवून त्यांस तसे न करण्याची विनंती केली, आणि अशा रीतीने फेरोजशहा, टाइम्सचे संपादक मिस्टर बेनेट वगैरेंच्या सहाय्याने गोखले हे या जागेसाठी निवडून आले. ही निवडणूक एप्रिल १९०१ मध्ये झाली. गोखल्यांस समाधान झाले; आणि समाधानाबरोबर त्यांच्यावर जबाबदारीही येऊन पडली.

वरिष्ठ कायदेकौन्सिलात किंवा प्रांतिक कायदेकौन्सिलात जाण्यात सरकारबरोबर जबाबदारपणे झगडून जनसेवा करावयाची हा जरी गोखल्यांचा हेतू असला तरी या हेतूच्या आत दुसरा एक हेतू होता. मागे आम्ही सांगितलेच आहे की, गोखल्यांस इंग्लंडमध्ये चळवळ करावी, काम करावे असे वाटे; परंतु १८९७ च्या प्रसंगामुळे त्यांचे मन दुखावले होत. इंग्लंडमध्ये त्यांचे नाव बददू झाले होते आणि जरी त्यांनी माफी मागितली होती तरी लोक 'हाच तो पूर्वीच्या खोटया कंडया उठविणारा' असे म्हणणार अशी त्यांस भीती वाटे. हा लोकांच्या अंदेशा- गैरसमज कायमचा जावा आणि आपण एकदा (मनाच्या प्रामाणिकपणे जरी घसरलो नसलो तरी एकंदरीत) घसरलो, पण तेव्हापासून पुढे आपण जबाबदारपणेच सरकारवर टीका केली असून सरकारचा व लोकांचा विश्वास संपादन केला आहे हे त्यांस इंग्लंडमधील लोकांस दाखवून त्यांचे मन साफ करावयाचे होते. त्यामुळे त्यांस इंग्लंडात जाऊन काम करता आले असते. फेरोजशहांस लिहिलेल्या वरील पत्रात त्यांनी त्याप्रमाणे लिहिले आहे, आणि १८९७ पासून आपल्या मनात कसे कसे विचार घोळत आहेत याचे त्यांनी हृदयास पीळ पडेल अशा रीतीने वर्णन केले आहे.

त्या पत्राचा सारांश असा : १८९७ च्या वावटळीत माझ्या डोक्यावर तर टीकांचा वर्षाव झाला. परंतु इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मजविषयी उच्चारलेले शब्द ज्या रात्री मी वाचले त्या वेळेस तापलेल्या सळईप्रमाणे ते माझ्या अंत:करणात घुसले आणि मनाचा आगडोंब उडाला. त्याच वेळेस मी माझ्या मनाशी अशी खूणगाठ बांधून ठेविली की आपल्या कारणीने ज्या इंग्लंडमधील चळवळीस धक्का बसला आहे, तीच चळवळ सोसायटीमधील आजन्म सेवाव्रताची परिपूर्णता होताच हातात घ्यावयाची. या कामासाठी वरिष्ठ कायदेकौन्सिलात जर मी गेलो तर बरे होईल. कारण मी इंग्लंडला गेलो असता माझ्याविरुध्द काहूर माजेल खरे; परंतु लॉर्ड सँढर्स्ट यांचा शब्द, आणि प्रांतिक व वरिष्ठ कौन्सिलातील माझे सभासदत्व या गोष्टीमुळे हे काहूर आपोआप शमेल. माझ्या कौन्सिलमधील  चळवळीने वेडरबर्न, ह्यूम, दादाभाई- ज्यांच्यावर माझ्या कृत्यामुळे माना खाली घालण्याचा प्रसंग आला- या सर्वांस आनंद होईल आणि म्हणून हे काम मी करणार आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel