देवदत्ताने केलेला संघभेद

संघात सरळपणा आणि मैत्रीभाव राहावा यासंबंधी भगवान फार खबरदारी घेत असे. तथापि मनुष्यस्वभाव असा काही विचित्र आहे की, त्याच्या समुदायात मतभेद होऊन येणेप्रमाणे चार शरीरोपयोगी पदार्थ सावधानपणे वापरण्याचा पच्चवेखण (प्रत्यवेक्षण) म्हणतात आणि त्याची वहिवाट आजताही चालू आहे.

तट पडावयाचेच याला मुख्य कारण म्हटले म्हणजे अभिमान आणि त्याच्या मागोमाग अज्ञान, मनुष्य कितीही साधेपणाने वागला, तरी तो जर पुढारी होण्याची इच्छा बाळगीत असला, तर दुसर्‍याच्या गुणांना अवगुणांचे स्वरूप देऊन आला मोठेपणा वाढविण्याचा प्रयत्न केल्यावाचून राहणार नाही. याच्या जाळ्यात जर अज्ञानी लोक सापडले, तर त्याला सहज एखादा विलक्षण संप्रदाय स्थापता येतो.

बौद्ध संघात अशा प्रकारचा भिक्षु म्हटला म्हणजे देवदत्त होय. हा वाक्यापैकी एक असून बुद्धाचा नातेवाईक होता. याने संघाचे पुढारीपण आपल्या स्वाधीन करावे, अशी भगवंताला विनवणी केली. भगवंताने ती मान्य केली नाही. तेव्हा अजातशत्रू राजाकडून बुद्धाला मारण्यासाठी त्याने मारेकरी पाठविले. पण ते बुद्धाचा खून न करता उलट त्याचेच शिष्य झाले. तेव्हा देवदत्ताने गुध्रकुट पर्वताच्या एका टेकडीवरून बुद्धावर एक मोठी धोंड टाकली. तिची एक चीप बुद्धाच्या पायाला लागून त्याला जखम झाली. ती बरी झाल्यावर भगवान राजगृहात भिक्षाटनास गेला असता देवदत्ताने त्याच्यावर नालगिरी नावाचा महान्मत्त हत्ती सोडवयास लावले. त्याने भगवंताची पदधुलि मस्तकावर घेतली आणि तो पुन्हा आपल्या पागेत जाऊन उभा राहिला. याप्रमाणे सर्व मसलती फसल्यावर देवदत्ताने संघाला तपश्चर्येचे कडक नियम घालून देण्याची भगवंताला विनंती केली आणि ती भगवंताला मान्य न झाल्यामुळे संघात तट पाडून व काही भिक्षूंना बरोबर घेऊन तो गयेला गेला.

देवदत्ताची ही कथा सविस्तरपणे चुल्लवग्गात आली आहे.* परंतु तिच्यात ऐतिहासिक तथ्य फार थोडे दिसते. का की, देवदत्त जर खून करण्याइतका दुष्ट होता. तर त्याला संघात तट पाडता येणे शक्य झाले नसते आणि काही भिक्षु त्याचे भक्त बनले नसते.

अजातशत्रू युवराज असतानाच त्याची आणि देवदत्ताची मैत्री जमली आणि तेव्हापासून देवदत्त पुढारीपणासाठी प्रयत्न करू लागला, असे लाभसत्कारसंयुत्ताच्या ३६ व्या सुत्तावरून दिसून येते. त्या सुत्ताचा सारांश असा –

‘युद्ध भगवान राजगृह येथे वेळुवनात राहत होता. त्याकाळी अजतशत्रू राजकुमार ५०० रथ बरोबर घेऊन सकाळी संध्याकाळी देवदत्ताच्या दर्शनास जात असे आणि देवदत्ताला ५०० पात्रांचे जेवण पाठवीत असे. काही भिक्षूंनी ही गोष्ट भगवंताला सांगितली तेव्हा भगवान म्हणाला, “भिक्षुहो, देवदत्ताच्या लाभसत्काराची स्पुहा करू नका. लाभामुळे देवदत्ताची हानीच होणार आहे. बुद्धी होणार नाही.”’

याशिवाय देवदत्ताला उद्देशून भगवंताने म्हटलेली खालील गाथा दोन ठिकाणी आढळते,

फलं हे कदलिं हन्ति फलं वेळूं फलं नळं।
सवकारी कापुरिसं हन्ति गब्भो अस्सतरि यथा।*

‘फळ केळीचा नाश करते. फळ वेळूचा आणि फळ नळाचा नाश करते; आणि खेचरीचा गर्भ खेचरीचा नाश करतो. त्याचप्रमाणे सत्कार कापुरुषाचा नाश करतो.’

यावरन देवदत्त अधिकार मिळविण्यासाठी अजातशत्रूच्या साहाय्याने कशी खटपट करीत होता याचे अनुमान करता येते अजातशत्रू बापाला मारून गादीवर आला तरी देखील देवदत्ताने त्याची संगति सोडली नाही आणि त्याच्याच मदतीने संघात फूट पाडून बर्‍याच भिक्षूंना त्याने आपल्या नादी लावले. हे त्याचे कृत्य बुद्ध भगवंताला आवडले नाही यात आश्चर्य कसले? परंतु देवदताने पाडलेली फूट संघाला हानिकारक न होता त्या संकटातून संघ सुखरूपपणे पार पडला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel