एवं स भौतिकं दुःखं दैविकं दैहिकं च यत् ।

भोक्तव्यमात्मनो दिष्टं प्राप्तं प्राप्तमबुध्यत ॥४१॥

भिक्षु बोले निजविवेक । त्रिविध प्रारब्धें बांधले लोक ।

तेणें भोगणें पडे आवश्यक । रावो रंक सुटेना ॥६८॥

भूतांची पीडा ते भौतिक । देवांची पीडा ते दैविक ।

देहीं उपजती ज्वरादिक । हे पीडा देख दैहिक ॥६९॥

यापरी त्रिविध दुःख । प्रारब्ध झालें जनक ।

तें भोगितां मानी असुख । तो केवळ मूर्ख अतिमंद ॥५७०॥

जे भोग आले प्रारब्धेंसीं । तेथें साह्य केल्या हरिहरांसी ।

भोग न चुकती प्राण्यासी । हें जाणोनि संन्यासी क्षमावंत ॥७१॥

कृष्ण साह्य पांडवांसी । ते भोगिती नष्टचर्यासी ।

तेथें साह्य केल्या हरिहरांसी । प्रारब्ध कोणासी टळेना ॥७२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel